Home > Essay > डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी निबंध

डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी निबंध

In this article we are providing: essay on apj abdul kalam in marathi, My Favourite Scientist APJ Abdul Kalam Essay in Marathi.

Biography of APJ Abdul Kalam in Hindi

Read Also: डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम का जीवन परिचय

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर निबंध – Essay on APJ Abdul Kalam in Marathi

10 Line on Abdul Kalam in Marathi

मराठ्यातील अब्दुल कलाम वर 10 ओळी:

  1. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूमध्ये मुस्लिम कुटुंबात झाला.
  2. एपीजे अब्दुल कलाम हे भारतातील एक महान शास्त्रज्ञ होते.
  3. श्री जैनुलब्दीन आणि श्रीमती अशिअम्मा हे अपज अब्दुल कलाम पालक होते.
  4. एपीजे अब्दुल कलाम हे मिसळले माणूस म्हणून व्यापकपणे ओळखले जातात.
  5. एपीजे अब्दुल कलाम वडील त्याला संध्याकाळी प्रार्थनासाठी मशिदीत घेऊन गेले.
  6. अभियांत्रिकी उत्तीर्ण झाल्यावर अपज अब्दुल कलाम संरक्षण विभागात वैज्ञानिक म्हणून रुजू झाले.
  7. एपीजे अब्दुल कलाम यांना वृत्तपत्र फेरीवाला म्हणून पहिले वेतन मिळाले.
  8. त्यांचे वडील एक अतिशय व्यावहारिक मनुष्य होते आणि आप अब्दुल कलाम आई एक अतिशय धार्मिक स्त्री होती.
  9. आपज अब्दुल कलाम यांना विश्रांतीच्या वेळी गीता आणि कुराण वाचण्यास आवडले.
  10. २००२ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ सन्मानाने सन्मानित करण्यात आले.
  11. आपज अब्दुल कलाम यांनी देशाच्या विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य बलिदान केले.
  12. आपज अब्दुल कलाम यांचे वयाच्या 83 व्या वर्षी 27 जुलै 2015 रोजी निधन झाले.

APJ Abdul Kalam Essay in Marathi (350 Words)

भारताचे अकरावे राष्ट्रपती, मिसाईल मॅन म्हणून प्रसिद्ध असणारे शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे संपूर्ण नाव अबुल पाकिर जैनुलब्दीन अब्दुल कलाम आहे. त्यांचा जन्म तामिळनाडूत रामेश्वरम् येथे १५ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. त्यांचा जन्मदिवस हा जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो.

ए.पी.जे. अब्दुल कलाम हे एरोनॉटिकल इंजिनिअर होते. ते विद्यार्थीदशेत असताना कुशाग्र बुद्धीचे धनी होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने उच्च शिक्षण घेणे शक्य नव्हते. त्यांचे माध्यमिक शिक्षण रामनाथपुरम येथे झाले. त्यानंतर त्यांनी सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी घेतली. एरोस्पेस तंत्रज्ञानाबद्दल त्यांना प्रचंड आवड होती.

एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा त्यांनी चेन्नई येथे पूर्ण केला. तो पूर्ण करण्यासाठी त्यांच्या बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवले होते. एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील ‘नासा’ या संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी त्यानंतर संरक्षण संशोधन व विकास संस्था मध्ये १९५८ ते १९६३ यादरम्यान कार्य केले.

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पीएसएलव्ही (सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेईकल) या संशोधन क्षेत्रात काम पाहू लागले. “अग्नी” या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे ते खूपच प्रसिद्ध झाले.
त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखण्यात येऊ लागले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाची धोरणे आखली. त्यानंतर संरक्षण मंत्री, वैज्ञानिक सल्लागार आणि D.R.D.O. चे प्रमुख या नात्याने त्यांनी अर्जुन हा रणगाडा व लाईट काँबॅट एअरक्राफ्ट या दोन्हींच्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावली.

भारतातील प्रमुख वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध होत चाललेले कलाम हे स्वभावाने खूपच साधे आणि संवेदनशील होते. त्यांनी २००२ ते २००७ या काळात भारताचे ११ वे राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला. डॉ. कलाम हे अविवाहित आणि शाकाहारी होते. त्यांच्याकडे खूप संपत्ती देखील नव्हती. भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न ते बाळगून होते. त्यांचे विचार, भाषणे ही युवकांना खूप भावत असत. भारतीय तसेच जगभरातील युवकांचे ते प्रेरणास्थान होते. भारत सरकारने ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ व ‘भारतरत्‍न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे.

राष्ट्रपतीपद पाहिल्यानंतर कलाम हे भारतातील नामांकित विद्यापीठांमध्ये विसिटींग प्राध्यापक म्हणून काम करू लागले. त्यांनी संशोधन व तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान असे विषय यादरम्यान हाताळले. त्यांची विज्ञानविषयक भाषणे खूप प्रसिद्ध आहेत. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जीवन म्हणजे संपूर्ण भारतीय युवा पिढीसाठी प्रेरक असेच आहे. असा हा मिसाईल मॅन २७ जुलै २०१५ रोजी अनंतात विलीन झाला.

APJ Abdul Kalam Marathi Nibandh (400 Words)

डॉ अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम  (जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले.

त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली.

नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी ‘मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील ‘नासा’ या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी संबंध आला.

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.

स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या ‘विक्रम साराभाई अवकाश केंद्रा’चे ते प्रमुख झाले.

वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील ‘अग्नी’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे आहेत. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद आहे. भारत सरकारने ‘पद्मभूषण’, ‘पद्यविभूषण’ व १९९८ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित आहेत व पूर्ण शाकाहारी आहेत. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते पाहतात. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे.

भारत सरकारने ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ व १९९७ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.

Marathi Essay on Dr. APJ Abdul Kalam (500 Words)

प्रस्तावना

आमचा भारत देश हा महान नेत्यांचा देश मानला जातो. या देशामध्ये बरेच काही महान नेता होऊन गेले. त्यापैकी एक आहेत – डॉ. ए पी जे अब्दुल कलाम. कलाम यांनी वैज्ञानिक, संशोधक, शिक्षक आणि भारत देशाचे राष्ट्रपती इ. सर्व पदावर कार्य केले.

त्यांनी इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने कार्य केले म्हणून ते सर्व लोकांचे राष्ट्रपती म्हणून प्रसिद्ध झाले. डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती पदाच्या ५ वर्षाच्या काळात भारतीय लोकांच्या मनामध्ये मानाचे स्थान मिळवले.

जन्म

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९३१ रोजी तामिळनाडू मधील रामेश्वरम येथे माध्यम वर्गात झाला. त्यांचे संपूर्ण नाव डॉ. अबुल पाकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे होते. कलाम यांच्या वडिलांचे नाव जैनुलाब्दीन अब्दुल होते.

त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून नेण्याचे – आणण्याचे काम करत होते. परंतु लहान वयातच वडिलांचे छत्र हरपले. त्यावेळी त्यांनी वर्तमान पत्रे विकून आणि लहान – मोठी काम करून घरी हातभार लावला. त्यांचे बालपण कठीण प्रसंगातून गेले.

शिक्षण

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी आपले प्राथमिक शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. शाळेत असताना त्यांना गणित या विषयी भरपूर आवड होती. त्यानंतर त्यांनी तिरुचिपल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेज मध्ये प्रवेश घेतला.

कलाम यांनी भौतिक शास्त्रात बी. एस्सी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी चेन्नई मधील इंस्टीट्यूट ऑफ टेकनोलोजि मध्ये प्रवेश घेतला. डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांना भारतीय हवाई दलात लढाऊ विमानाचे वैमानिक होण्याचे स्वपन होते.

कलाम यांचे कार्य

डॉ. ए पी जे पाबद्दल कलाम यांचा संबंध सन १९५८ ते १९६३ मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेशी आला. कलाम यांनी भारतीय सेनेसाठी छोटे – छोटे हेलीकॉप्टर बनवण्यास सुरुवात केली. सन १९६३ मध्ये त्यांनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेत क्षेपणास्त्र विकासाच्या कामामध्ये सहभागी होऊ लागले. कलाम पुन्हा इंदिरा गांधीच्या काळात क्षेपणास्त्र विकासासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमध्ये आले.

तेव्हा पासून त्यांनी स्वदेशात सुद्धा क्षेपणास्त्र बनवण्याचा ध्यास घेतला. क्षेपणास्त्र विकास कार्यामधील अग्नी क्षेपणास्त्रच्या यशस्वी चाचणीमुळे कलाम यांचे संपूर्ण जगभरात कौतुक झाले. कलाम यांना स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्र तयार करण्याची जिद्द तेव्हापासून होती..

राष्ट्रपती पदावर कार्य

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांना १० जून, २००२ मध्ये राष्ट्रपती पदासाठी यांचे नाव सुचवण्यात आले. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यामुळे ते भारत देशाचे राष्ट्रपती बनले. ते देशाचे ११ वे राष्ट्रपती होते आणि त्यांनी हे पद २५ जुलै, २००२ पासून २५ जुलै २००७ पर्यंत निभावले.

पुरस्कार

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांना अन्य पुरस्काराने सन्मानित केलं. त्यांना सन १९८१ मध्ये पदमभूषण, सन १९९० मध्ये पदमविभूषण आणि सन १९९७ मध्ये भारताच्या सर्वोच्च पुरस्कार ‘भारतरत्न’ या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं.

स्विझर्लंडने हि त्यांच्या वैज्ञानिक कामगिरीची दाखल घेऊन ज्या दिवशी त्यांनी स्विझर्लंडला भेट दिली तो दिवस ‘विज्ञान दिवसच्या‘ रूपाने साजरा केला जातो.

निष्कर्ष

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी देशाला अवकाश क्षेत्रात पुढे नेणारे तसेच मिसाईल आणि क्षेपणास्त्र स्वयं बनवणारे, देशाच्या तरुणांना – युवकांना देशकार्यासाठी जोडणारे, विद्यार्थ्यांमध्ये रमणारे त्यांना मार्ग दाखवणारे कलाम चाचा होते. डॉ कलाम हे देशाच्या युवकांसाठी सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे.

Abdul Kalam Nibandh in Marathi (600 Words)

डॉ. एपीजे अब्दुल कलाम, ज्याला ‘मिसाइल मॅन’ म्हणून ओळखले जाते, भारताचे पहिले नागरिक, भारताचे राष्ट्रपती असल्याने त्यांची उंची वाढली. ते भारताच्या एकात्मिक मिसाइल विकास कार्यक्रमाचे आर्किटेक्ट होते आणि सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारत रत्न प्राप्तकर्ता होते. आजच्या जगामध्ये तो प्रामाणिकपणा आणि सामाजिक योगदानकर्त्याचा एक दुर्मिळ उदाहरण आहे, जेथे बहुतेक लोक मध्यस्थता, पाखंड आणि भ्रष्टाचाराने भटकले आहेत.

अविल पकीर जैनुलबदीन अब्दुल कलाम 15 ऑक्टोबर 1 9 31 रोजी तामिळनाडुमधील रामेश्वरम येथे जन्मलेले होते. त्यांचे वडील जैनुलबदीन हे नाववाहक होते आणि स्थानिक मशिदीतील इमाम आणि त्यांची आई, असिआम्मा घराण्यातील एक निर्माता होते, कलाम त्यांच्या भावांबरोबर सर्वांत तरुण होते. शाळेच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये कलाम एक सामान्य विद्यार्थी होता परंतु दृढ आणि परिश्रम करणारा होता.

श्वार्टझ उच्च माध्यमिक शाळेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी 1954 मध्ये सेंट जोसेफ कॉलेजमधून भौतिकशास्त्रात पदवी मिळवली. 1955 मध्ये त्यांनी एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास करण्यासाठी मद्रास येथे स्थलांतर केले. 1960 मध्ये कलाम डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) च्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटमध्ये सामील झाले परंतु डीआरडीओमध्ये नोकरीच्या निवडीबद्दल त्यांना काहीच शंका नव्हती.

नऊ वर्षानंतर 1969 मध्ये त्यांना भारतीय स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) येथे हस्तांतरित करण्यात आले जेथे त्यांनी भारतातील प्रथम उपग्रह प्रक्षेपण वाहन (एसएलव्ही -111) तयार करण्याचे निर्देश दिले ज्याने जुलै 1980 मध्ये ‘रोहिणी’ उपग्रह यशस्वीपणे तैनात केले. बलिस्टिक मिसाइल विकसित करण्यासाठी, ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन आणि अॅडव्हान्स मिसाइल प्रोग्राम्स तयार करण्यासाठी प्रकल्प निर्देशित करणे यासारख्या विविध प्रयत्नांमुळे, कलाम त्याच्या कामासाठी ‘द मिसाइल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणार्या सर्वोत्तम ज्ञात परमाणु शास्त्रज्ञ होते.

देश, महाशक्ती, अमानुषपणामुळे भरलेले, आपल्या देशावर जबरदस्तीने, जबरदस्तीने, लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करीत आहेत आणि त्यांच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी त्यांच्यावरील शस्त्रांवर अवलंबून राहून डॉ. कलाम यांनी बुद्धिमत्ता आणि वैज्ञानिक एकत्र एकत्रित केले आहे. एकीकृत मार्गदर्शित मिसाईल कार्यक्रमाची महत्वाकांक्षा लक्षात घेता.

वैज्ञानिक संशोधन आणि भारतातील संरक्षण तंत्रज्ञानाच्या आधुनिकीकरणाच्या विकासात त्यांचे योगदान त्यांना प्रतिष्ठा, विजेतेपद आणि सन्मान मिळाले. त्यांना पद्मभूषण, पद्म विभूषण, भरत रत्न, वीर सावरकर पुरस्कार आणि बरेच काही सन्मानित करण्यात आले. 40 पेक्षा जास्त विद्यापीठांच्या मानद डॉक्टरेटने सन्मानित केले असले तरी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार कलाम अतिशय साधे जीवन जगतात.

तो अखंडता आणि स्थान प्रभावशाली वृत्तीबद्दल उल्लेखनीय होता. 2002 मध्ये, कलाम यांना सत्तारूढ पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या समर्थनासह भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आले. ‘एपीजे प्रेसिडेंट’ या नावाने ओळखले जाणारे डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे त्यांच्या जीवनासाठी व उपक्रमांबद्दलच्या ज्ञानासाठी प्रसिद्ध आहेत जे इतर शास्त्रज्ञांना आश्चर्यचकित करतात.

त्यांचा असा विश्वास होता की, “जर तुम्हाला सूर्याप्रमाणे चमकणे आवडत असेल तर प्रथम सूर्याप्रमाणे जळा.” कारण “आपल्या सहभागाशिवाय आपण यशस्वी होऊ शकत नाही. आपल्या सहभागाशिवाय आपण अयशस्वी होऊ शकत नाही”. शाश्वत वाचक, शास्त्रीय संगीत प्रेमी आणि तमिळ साहित्याचे कवी, एक महान शास्त्रज्ञ, धार्मिक धार्मिक व्यक्तिमत्व आणि जे नाही ते आपल्या वेळेचे आदर्श व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ शकते.

एक अग्रगण्य स्तंभलेखक डॉ कलाम यांनी लिहिले की “भारताला प्रत्येक संस्थेत कलाम आवश्यक आहे”. आपल्या साहित्यिक उत्कर्षामध्ये डॉ. कलाम यांनी ‘विंग्स ऑफ फायर’, ‘2020-ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’, ‘माय जर्नी’, ‘इग्निटेड माइंड्स’, ‘द लामिनस स्पार्क्स’ यासारख्या अनेक पुस्तके लिहिली आहेत. ‘द लाइफ ट्री’, ‘चिल्ड्रन आस्क कलम’, ‘इन्डोमेबल स्पिरिट’, ‘प्रेरणादायक विचार’, ‘एक अधिकारित राष्ट्रांचे निरीक्षण’, ‘मिशन इंडिया’. यापैकी बरेच जण भारतात आणि परदेशात भारतीय नागरिकांमध्ये घरगुती नावे आहेत.

या पुस्तकांची अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवादित केलेली आहे. डॉ. कलाम (वय 83) 27 जुलै 2015 रोजी हृदयविकाराच्या कारणास्तव इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) शिलांग येथे व्याख्यान देत असताना निधन झाले. रामेश्वरम येथील त्यांच्या मूळ शर्यतीत पूर्ण राज्यसभेच्या सन्मानार्थ त्यांचा अंत झाला. त्यांच्या सन्मानार्थ एक स्मारक बांधण्यात येत आहे. कलाम भारतातील विद्यार्थी समुदायासह त्यांच्या प्रेरक भाषणांबद्दल आणि संवाद साधण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

त्याच्याकडून काही प्रेरणादायक उद्धरण आहेत: “आम्ही आमच्या तरुण पिढीला समृद्ध आणि सुरक्षित भारत देण्याऐवजी केवळ सभ्यतेच्या वारसाच्या बरोबरीने आर्थिक समृद्धी मिळाल्यासच लक्षात ठेवू.” “एव्हरेस्टच्या वरच्या किंवा आपल्या कारकीर्दीच्या शीर्षस्थानी असला तरी तो शीर्षस्थानी चढला आहे.” एपीजे अब्दुल कलाम यांना भारत अशा ऋतूत व्यक्तिमत्त्वावर अतुलनीय मार्गाने अभिमान वाटतो आणि त्यांना अभिमान वाटतो.

Read Also

Rahul Singh Tanwar
Rahul Singh Tanwar
राहुल सिंह तंवर पिछले 7 वर्ष से भी अधिक समय से कंटेंट राइटिंग कर रहे हैं। इनको SEO और ब्लॉगिंग का अच्छा अनुभव है। इन्होने एंटरटेनमेंट, जीवनी, शिक्षा, टुटोरिअल, टेक्नोलॉजी, ऑनलाइन अर्निंग, ट्रेवलिंग, निबंध, करेंट अफेयर्स, सामान्य ज्ञान जैसे विविध विषयों पर कई बेहतरीन लेख लिखे हैं। इनके लेख बेहतरीन गुणवत्ता के लिए जाने जाते हैं।

Related Posts

Comment (1)

Leave a Comment